Monday, 28 August 2017

ग्रामीण सामाजिक परिवर्तनाची चळवळ गतिमान करु ग्रामविकासासाठी कॉर्पोरेट क्षेत्राचे योगदान कौतुकास्पद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



मुंबईदि28 :  सीएसआरशासनाचा निधी आणि लोकांचा सहभाग यांच्या एकत्रित सहभागातून सुरुकरण्यात आलेल्या ग्रामीण सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीने राज्यात चांगली गती घेतली आहेकॉर्पोरेटक्षेत्राने या कामी दाखविलेला उत्साह आणि दिलेला सहयोग निश्चितच कौतुकास्पद आहेमहाराष्ट्र ग्रामीणसामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या  हजार गावांचा सर्वांगिणविकास तर केला जाईलचपण या माध्यमातून इतर गावांनाही प्रेरणा मिळून राज्यात ग्रामविकासाची चळवळअधिक गतिमान होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सीएसआर निधीराज्य शासनाचा निधी आणि लोकांचा सहभाग यांच्यामधून राज्यातील एक हजार गावांचा विकास करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहेयासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या गव्हर्निंग कौन्सिलची तिसरी बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होतेबैठकीस ज्येष्ठ उद्योजक रतन टाटाआनंद महिंद्राराज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेकौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकरजलसंधारण मंत्री प्राराम शिंदेउद्योजक रॉनी स्क्रूवालाजरीना स्क्रूवालाअजय पिरामल,अमित चंद्रापार्थ जिंदाल, शिखा शर्मासंजीव मेहताहेमेंद्र कोठारीनिखील मेस्वानीमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशीआदर्श गाव हिवरे बाजारचे पोपटराव पवारविविध विभागांचे सचिव यांच्यासह विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.
लोकसहभागातून शाश्वत कामे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री श्रीफडणवीस पुढे म्हणालेमहाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन योजनेसंदर्भात आपण नुकतीच प्रधानमंत्र्यांना माहिती दिलीत्यांनीही या योजनेचे कौतुक केले आहेएकाच कामासाठी विविध योजना राबविण्याऐवजी अशा विविध योजनांचे एकत्रिकरण करुन गावांमध्ये विकास कामे केली जात आहेतगावाचा शाश्वत विकास होण्यासाठी लोकांची मानसिकता बदलणे आवश्यक असतेलोकांचा सहभाग घेऊन कामे केल्यास ती निश्चितच शाश्वत होतातअसे त्यांनी सांगितले.  
  दुर्गम भागात आयटी तंत्रज्ञानाचा वापर करून कनेक्टिविटी वाढविण्यावर भर देण्यात येत आहेदुर्गम,डोंगराळ आणि आदिवासी भागामध्ये टेलिमेडिसीनसारख्या सेवा आयटी तंत्रज्ञानामुळे पोहोचविणे शक्य होत आहेफाऊंडेशनच्या माध्यमातून यापुढील काळातही ग्रामविकासाच्या चळवळीला गती दिली जाईलअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील ग्रामविकासाची चळवळ आदर्शवत – रतन टाटा
ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यावेळी म्हणाले की, महाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन योजनेने चांगली गती घेतली असल्याचे जाणून आनंद झाला. गावांचा विकास हा शाश्वत होईल यावर भर देणे गरजेचे आहे.दारिद्य निर्मूलनावर भर देणे आवश्यक असून त्यादृष्टीने योजना राबविण्यात याव्यातशिवाय ज्या जिल्ह्यांमध्ये वेगळ्या संकल्पना यशस्वी झाल्या त्या इतर ठिकाणीही राबविण्यात याव्यातशासनकॉर्पोरेट आणि लोकांच्या सहभागातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेली ही चळवळ निश्चितच आदर्शवत आहेअसे त्यांनी सांगितले.
कॉर्पोरेट क्षेत्र ग्रामविकासासाठी योगदान देईल आनंद महिंद्रा
उद्योजक आनंद महिंद्रा म्हणालेमहाराष्ट्र ग्रामीण सामाजिक परिवर्तन योजनेने घेतलेली गती निश्चितच समाधानकारक आहेमहाराष्ट्रात यातून गावांमध्ये ग्रामस्थांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने व्यापक प्रयत्न होत आहेकॉर्पोरेट क्षेत्र यापुढील काळातही महाराष्ट्रात गावांच्या विकासासाठी योगदान देत राहीलअसे त्यांनी सांगितले.      
ग्रामविकासाची देशातील युनिक कन्सेप्ट – पंकजा मुंडे
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्यासीएसआरराज्य शासनाचा निधीलोकांचा सहभागस्वयंसेवी संस्थांचा सहभाग अशा एकत्रित प्रयत्नातून गावांचा विकास करण्याची राज्यातीलच नव्हे तर देशातील ही युनिक कन्सेप्ट आहेया मोहिमेतून हजार गावांचा शाश्वत विकास करण्यावर भर देण्यात येत आहेही गावे इतर गावांसाठी आदर्श ठरतील अशा पद्धतीने त्यांचा विकास करून ग्रामविकासाची चळवळ पुढे वाढविण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.
कौशल्य विकासावर भर देण्यात येईल – मंत्री संभाजी पाटील निलंगेकर
 कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणालेकृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहेकौशल्य विकास विभाग यादृष्टीने राज्यात कुशल मनुष्यबळ तयार करीत आहेलोकांना गावातच रोजगार मिळावास्थलांतर कमी व्हावे यादृष्टीने ग्रामीण तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यावर शासनाचा भर आहेसीएसआरमधूनही यासाठी भरीव मदत मिळत असून शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागातून कौशल्य विकासावर भर देण्यात येईलअसे त्यांनी सांगितले
आदर्श विकास आराखड्यासाठी गणेशवाडीला  लाखाचे बक्षीस
या योजनेतून निवडण्यात आलेल्या गावांचे विकास आराखडे तयार करण्यात आले आहेतशिवाय या गावांसाठी पूर्णवेळ ग्रामपरिवर्तक नेमण्यात आले आहेतराज्य शासनाचा निधी आणि सीएसआर निधी या गावांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यातून गावांमध्ये विविध योजना राबविण्यात येत आहेआजच्या बैठकीत काही प्रातिनिधिक जिल्ह्यांमधील गावांनी तयार केलेल्या विकास आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आलेयापैकी यवतमाळ जिल्ह्यातील गणेशवाडी गावाला आदर्श विकास आराखडा तयार केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
००००

No comments:

Post a Comment