· केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी दाखविली
हिरवी झेंडी
·
येत्या दोन वर्षात 20 टक्के जलवाहतूक करणार
·
सागरमाला रोरो सेवेव्दारा मालवाहतूक
·
चेन्नई, कांडला, वारानली येथून सुविधा
नागपूर दि. 28 :- अशोक लेलॅड कंपनीच्या 185 ट्रक चेसिस आज चेन्नई
बंदर येथून रोरो जलवाहतूक सेवेव्दारे बांगलादेशासाठी मोंगला पोर्ट येथे
पाठविण्याचा शुभारंभ केंद्रिय भूपृष्ठ व जहाजबांधणी वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते हिरवी
झेंडी दाखवून झाली.
चेन्नई येथील बंदरातून आज बांग्लादेशाला अशोक लेलॅड
कंपनितर्फे 185ट्रक वाहनाचे चेसिस सागरी जलवाहतूकीच्या मार्गाने रवाना करण्यात
आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांची व्हीडीओ
कॉन्फरसिंगव्दारे हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ट्रकची कन्साईनमेंट रोरो जलवाहतूक
सेवेव्दारे रवाना झाले.
बांगला देशाला रस्तामार्गाने ट्रक चेसिस पाठविण्यासाठी
लागणाऱ्या वेळेमध्ये 15 ते 20 दिवसाची बचत झाली असून वाहतुकीसाठी येणारा खर्च अत्यल्प
असल्याचे सांगतांना केद्रियमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, प्रधान मंत्री नरेंद्र
मोदी यांनी बांगला देशाच्या भेटीप्रसंगी कोस्टल शिपींग संदर्भात भारत आणि
बांगलादेशा दरम्यान महत्वपूर्ण करार झाला होता. त्यानुसार रोरो जलवाहतुक सुरू
करण्यात आली आहे.
जलमार्गाने मालवाहतूकरिता प्राधान्य देण्यात आल्याचे
सांगतांना केंद्रियमंत्री नितीन गडकरी म्हणाले की भारताला साडेसात हजार किलोमिटर
समुद्र किनारा असून 111 नदीच्या माध्यमातून जलवाहतुकीला सुरूवात करण्यात आली आहे.
मालवाहतूकीसाठी चीन जपान आदी देशात अत्यल्प खर्च येत आहे.भारतातही रेल्वेव्दारे 1
सस्ता भूपृष्ठ वाहतुकीव्दारे दीड रूपया चा जलवाहतुकीव्दारे केवळ 15 पैसे खर्च येतो
त्यामुळे येत्या दोन वर्षात 18 ते 20 टक्के मालवाहतुक जलमार्गाने करण्याला
प्राधान्य असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
ॲटोमोबाईल
उद्योगांना प्रोत्साहन
चेन्नई गुडगाव तसेच देशातील विविध राज्यात असलेल्या
ॲटोमोबाईल उद्योगांना नियमित जलमार्गानी वाहतूक वाढवावी यासाठी विशेष प्रोत्साहन
देण्यात येत असल्याचे सांगतांना केंद्रियमंत्री नितीन गडकरी म्हणाले की, वाराणसी,
येथून गंगानदीच्या जलमार्गाने मारोती वाहनाची निर्यात बांग्लादेशाला करण्यात आली
आहे. जलवाहतुकीमुळे वाहतूक खर्चात बचत झाली असून गाड्याची किमतीतही चार हजार रूपयांनी कमी होण्यास मदत झाल्याचे
केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
समुद्र मार्गाने बांग्लादेशाला ट्रक चेसिसची वाहतूक करण्यात
आल्यामुळे 250 लक्ष किलोमीटर रस्त्यावरील वाहतुकीची बचत झाली आहे. तसेच वेळही
मोठयाप्रमानात वाचला. अशोक लेलॅंड तर्फे सुमारे 12 हजार ट्रक चेसिस बांग्लादेश,
श्रीलंका तसेच आफ्रिका देशांना पाठविण्यशत येणार असून संपूर्ण मालवाहतूक
जलमार्गाने करण्यात येणार आहे. दर महिन्याला सरासरी पाचशे ट्रक जलवाहतूक मार्गाने
निर्यात करण्यात येणार असल्यामुळे रस्त्यावाहतुक वरील ताण कमी होईल तसेच वेळ व
पैशाची सुध्दा बचत होणार आहे.
अशोक लेलॅडतर्फे वरील तांत्रिक संचालक टी. एन. काणमुर्ती व
श्रीमती आनंदी वेकटेशन यांनी स्वागत करून जलमार्ग वाहतुकी संदर्भात माहिती दिली.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के.राव, उपजिल्हाधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा
सूचना विज्ञान अधिकारी धनजय केसकर, अतिरीक्त जिल्हा सूचना अधिकारी क्षामा बोरीले
आदी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment