मुंबई, दि. 3 : कोळी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य शासनाची भूमिका सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या नेतृत्वाखालील कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची आज दुपारी मंत्रालयात भेट घेतली. यावेळी कोळी समाजाच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, चेतन पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment