मुंबई, दि. 30 : केंद्रीय दक्षता आयोगाकडून दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले जाते. सदर सप्ताहाची सुरुवात सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर 2017 रोजी झाली आहे.
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सोमवारी (दिनांक 30) राज्यपाल चे विद्यासागर राव यांचे सचिव बी वेणूगोपाल रेड्डी यांनी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा दिली. कालबाह्य आणि अतिरिक्त प्रक्रियाकमी करून कामकाजातील पारदर्शकता वाढविल्यास भ्रष्टाचारावर नियंत्रण आणता येऊ शकेल असे, राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी यावेळी दिलेल्या संदेशात सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य प्रशासन विभागामार्फत राज्यात राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आपल्या संदेशाद्वारे यावेळी केले.
जीवनाच्या सर्व क्षेत्रातून भ्रष्टाचाराचे उच्चाटण करण्याची तसेच कार्यक्षेत्रात सचोटी व पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली.
००००
No comments:
Post a Comment