मुंबई दि. 31 :
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने ‘रन फॉर युनिटी’ या दौडीचा प्रारंभ राज्यपाल चे.
विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनसीपीएयेथूनकरण्यातआला.
या
कार्यक्रमास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री
सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार
संजय काकडे, आमदार राज पुरोहित, मुख्य
सचिव सुमित मल्लिकउपस्थित होते.
यावेळी राज्यपाल महोदय यांनी इंग्रजी भाषेत
उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी
मराठीमध्ये शपथ दिली. दौडमध्ये विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, एन.सी.सी., एन.एस.एस.
चे विद्यार्थी, भारत स्काऊट गाईडचे विद्यार्थी, विविध जिमखान्यांचे खेळाडू, शासकीय
कार्यालयाचे कर्मचारी, विविध
बँका तसेच नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मरीन ड्राईव्हमार्गे दौडचा
समारोप शेवटी ग्रँट मेडिकल जिमखाना येथे झाला.
यावेळी
मुख्यमंत्री म्हणाले की, सरदार
वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता राखण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. आज त्यांच्या
नावाने संपूर्ण देशभरात ‘रन
फॉर युनिटी’ दौड
आयोजित केली जात आहे. ही धाव राष्ट्रीय एकतेला, एकात्मतेला समर्पित आहे. सर्व
वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी होऊन हा देश एक राहील, देशाची अखंडता कोणीही दूर करू शकत नाही
अशा प्रकारचा संदेश या दौडीच्या माध्यमातून देण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
कार्यक्रमास
बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, सामान्य
प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, जिल्हाधिकारी
संपदा मेहता उपस्थित होत्या.
००००
No comments:
Post a Comment