मुंबई, दि. २९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘राज्यातील उद्योगवाढीस चालना आणि त्यांचा विकास’ या विषयावर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दि. ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.
महाराष्ट्र राज्य उद्योगवाढीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे. मेक इन इंडिया या उपक्रमांतर्गत शासनाने राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना चालना दिली, उद्योग वाढीसाठी लागणा-या पायाभूत सुविधा, जागतिक गुंतवणुकदारांना अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्यासाठी, आणि व्यवसाय वृद्दिंगत करण्यासाठी "मैत्री एक खिडकी योजना" तसेच विशाल प्रकल्प धोरण याबाबतची माहिती दिलखुलास कार्यक्रमात श्री. देसाई यांनी दिली आहे. ही मुलाखत संजय जोग यांनी घेतली आहे.
00000
No comments:
Post a Comment