मुंबई,दि.19 : माहिती
व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात “जल जन जागृती सप्ताह”निमित्त जलसंपदा, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे आणि जलसंपदा सचिव
चन्नवीर बिराजदार यांची विशेष मुलाखत
घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. 20 मार्च रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होणार आहे. जल साक्षरता केंद्र, यशदाचे कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे यांनी ही
मुलाखत घेतली आहे
22 मार्च हा सर्व जगभर जागतिक जल दिन म्हणून साजरा
करण्यात येतो. यावर्षी "पर्यावरणासाठी पाणी" हा जागतिक जल दिनानिमित्त
महत्वाचा विषय असून पाण्याचे महत्व समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 16 ते 22 मार्च हा कालावधी “जल जनजागृती सप्ताह”म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने जलसंपदा
विभागाद्वारे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, मातृ विभागाची
संकल्पना , गाव ते
जिल्हा पातळीपर्यंत जल साक्षरतेसाठी प्रशासनाची भूमिका, कार्यशाळा तसेच जल साक्षरता केंद्राचा उद्देश्य आदी
विषयांची माहिती श्री शिवतारे आणि श्री बिराजदार
यांनी ‘जय
महाराष्ट्र’ कार्यक्रमातून
दिली आहे .
००००
No comments:
Post a Comment