मुंबई,दि.19: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित “दिलखुलास”कार्यक्रमात “जल जन जागृती सप्ताह”निमित्त जलसंपदा सचिव चन्नवीर बिराजदार यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून मंगळवार दि. 20 आणि बुधवार दि. 21 मार्च रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे
16 ते 22 मार्च हा कालावधी “जल जन जागृती सप्ताह”म्हणून साजरा केला जात आहे. जल संरक्षण, पाण्याच्या वापराबाबत सजगता निर्माण व्हावी यासाठी
जलसंपदा विभागाद्वारे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, नद्यांचे जीवनमान वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या
उपाययोजना तसेच बदलत्या वातावरणात पारंपरिक शेतीमध्ये करावयाचा बदल याबाबतची
माहिती श्री. बिराजदार यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment