मुंबई, दि. 1 : दुष्काळ
व्यवस्थापन संहिता 2016 नुसार खरीप हंगामात दुष्काळ घोषित
करण्याची अंतिम तारीख केंद्र शासनाच्या दिनांक 29 मे 2018 च्या पत्रान्वये सुधारित करुन 31 ऑक्टोबर निश्चित केलेली आहे. त्यामुळे राज्य शासनाने
दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार विहित मुदतीत दुष्काळ घोषित करण्याची कार्यवाही
केली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली
आहे.
मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासन निर्णय 31.10.2018 अन्वये राज्यात खरीप 2018 हंगामात 151 तालुक्यात मध्यम / गंभीर दुष्काळ घोषित
करण्यात आला आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार खरीप
हंगामात दुष्काळ घोषित करण्याची अंतिम तारीख केंद्र शासनाच्या दिनांक 29 मे 2018 च्या पत्रान्वये सुधारित करुन 31 ऑक्टोबर निश्चित केलेली आहे.
त्यामुळे राज्य शासनाने दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार विहित मुदतीत दुष्काळ
घोषित करण्याची कार्यवाही केली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार विहित करण्यात
आलेल्या सर्व शास्त्रीय निर्देशांकानुसार मुल्यांकन करुनच दुष्काळ घोषित करण्यात
आला आहे.
००००
No comments:
Post a Comment