मुंबई, दि 4 : महापे येथे लवकरच ज्वेलरी पार्क सुरू होणार आहे. त्यासाठी तीस एकर जमीन दिली आहे. या पार्कमुळे दागिने उद्योगाला चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
हिरे व्यापारातील कंपनी हरी कृष्णा ग्रुप्सच्या वतीने आयोजित स्किल इंडिया ईनेशिएटीव्ही सेरेमनी कार्यक्रमाच्या वेळेस श्री. फडणवीस बोलत होते. ग्रुपचे तुलसी भाई ढोलकिया, राहुल ढोलकीया लाखनी, सरकारी वकील उज्ज्वल निकम, माजी सनदी अधिकारी एस. एस. संधू आदी यावेळी उपस्थित होते. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चारचाकी वाहनांच्या चावीचे, तसेच मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या देशात खूप मोठया प्रमाणावर कौशल्य उपलब्ध आहे म्हणून युवकांनी शिक्षणाबरोबर कौशल्यही आत्मसात केले पाहिजे यासाठी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कौशल्य विकास योजनेवर भर दिला आहे. आपल्याकडे मोठी युवा शक्ती आहे. या शक्तीचा योग्य उपयोग केल्यास देशाच्या आर्थिक विकासात मोठा हातभार लागेल.
हिरे व्यापारात देशात मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होत असल्याने त्याचा देशाच्या आर्थिक विकासात मोठा हातभार आहे. यामध्ये हरी कृष्णा स्किल इंडिया कंपनीचे योगदान अमूल्य असे आहे. हरी कृष्णा कंपनीने आपल्या छोट्यातील छोट्या आणि मोठ्यातील मोठ्या कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांचा सन्मान केला ही उल्लेखनीय बाब आहे. याबरोबरच उद्योग करतानाच हरी कृष्णा कंपनीने देशासाठी मोठे योगदान दिले आहे. ही कंपनी स्वच्छ भारत अभियान आणि जलसंधारणच्या माध्यमातून मोठे काम करीत आहे. आपल्या कौशल्याने आणि कर्तबगारीतून समाजासाठी योगदान देता आलं पाहिजे. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
000
No comments:
Post a Comment