सांस्कृतिक व पर्यटनाला चालना
देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे चायनीज कंपन्यांना आवाहन
मुंबई, 24 : भारत व चीनचे सांस्कृतिक व पर्यटनाचे घनिष्ठ नाते असून ते अधिक वृध्दिंगत
करण्यात चायनीज कंपन्यांनी येथे पायाभूत सुविधा व पर्यटन विकासासाठी गुंतवणूक
करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पर्यटन, सांस्कृतिक भागीदारी, उद्योग आदी विषयांसबंधी सह्याद्री अथितीगृह येथे चीनच्या
शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान
सचिव भूषण गगराणी, सहसचिव सतीश जोंधळे पाटील उपस्थित होते.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी
यांच्या शिष्टमंडळाने विविध विषयांवर श्री. फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. चीन
येथे होत असलेल्या जागतिक प्रदर्शनामध्ये देशातील अधिक कंपन्यांना सहभागी करून
घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. श्री फडणवीस म्हणाले, भारत व चीन या दोन्ही देशांना
संस्कृतीची मोठी परंपरा लाभली आहे. पर्यटन हे क्षेत्र दोन्ही देशांना जोडणारा दुवा
आहे. पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय, उद्योगक्षेत्रालाही चालना मिळेल. त्यामुळे पर्यटन
विकासात पायाभूत सुविधांमध्ये चायनीज कंपन्यांनी गुंतवणूक करावी. चीनी
पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाहीदेखील श्री.
फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिली.
000
No comments:
Post a Comment