मुंबई, दि. 28 :
लोकसहभागातून ग्राम विकास संकल्पनेवर आधारित आदर्श गाव
योजनेसाठी पुरस्कारार्थी निवडीचे परिमाण निश्चित करून लवकरात लवकर मूल्यामापन
करावे, असे निर्देश मृद व जलसंधारण
मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज येथे दिले.
आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प
योजनेच्या राज्यस्तरीय समितीची बैठक आज मंत्रालयात समितीचे अध्यक्ष तथा मंत्री
प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समितीचे उपाध्यक्ष तथा जलसंधारण
राज्यमंत्री विजय शिवतारे, कार्याध्यक्ष
पोपटराव पवार, सचिव एकनाथ डवले, मृद संधारण संचालक कैलास मोते, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियानचे मुख्य कार्यपालन अधिकारी
रविंद्र शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
आदर्श गाव योजनेचा आढावा घेऊन प्रा.
शिंदे म्हणाले, नागरिकांचा व शासनाच्या
सहकार्यातून गावाचा आदर्श विकास करण्यात यावा, यासाठी जास्तीत गावांनी प्रस्ताव पाठवावेत. सध्या या योजनेसाठी राज्यातील 103 गावे पात्र ठरली आहेत. ही योजना तीन वर्षाऐवजी दोन
वर्षात पूर्ण करावी. हिवरे बाजार येथे यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास
प्रशिक्षण केंद्राला राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करावे. तसेच या
केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे.
श्री. पवार यांनी आतापर्यंत झालेल्या कामाची माहिती दिली.
००००
No comments:
Post a Comment