Thursday 28 February 2019

‘जय महाराष्ट्र’ व 'दिलखुलास' कार्यक्रमात रोहयो मंत्री जयकुमार रावल


मुंबई, दि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र'दिलखुलास' कार्यक्रमात मागेल त्याला काम,शिवाय वेळेत मजुरीया विषयावर दूरदर्शन आणि आकाशवाणीवर रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. दूरदर्शनवरील मुलाखतीत रोहयो आणि जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांचा सहभाग आहे.
 दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. १ मार्च रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत तर आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून 'दिलखुलास' कार्यक्रमात  शुक्रवार दि. १ मार्च रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत ही मुलाखत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे. दुष्काळी पार्श्वभूमीवर रोहयो विभागाने केलेले नियोजन, केंद्र शासनाने मनरेगा योजनेसाठी  वाढवलेले ५० दिवस, मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिर योजना, शेततळे, जलयुक्त शिवार योजनेचे यश, पाणंद रस्ते योजना या विषयी सविस्तर माहिती  कार्यक्रमातून दिली आहे.
००००



No comments:

Post a Comment