Wednesday 7 August 2019

कलम ३७० रद्द केल्याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन


जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे राज्य घटनेतील कलम ३७० रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संसदेचे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन करण्यात आले. केंद्र शासनाने हा निर्णय घेऊन जम्मू-काश्मिरला संपूर्ण देशाशी एकात्म करण्याची महान कामगिरी केल्याचेही मंत्रिमंडळाने म्हटले आहे.
देशातील इतर जनतेला मिळणारे अधिकार आणि हक्क कलम ३७० मुळे जम्मु-काश्मिरमधील जनतेला मिळत नव्हते. हे कलम रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या निर्णयाचे आजच्या बैठकीत स्वागत करण्यात आले.
-----०-----

No comments:

Post a Comment