Wednesday 7 August 2019

सुषमा स्वराज यांना मंत्रिमंडळाची श्रद्धांजली



माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र शोक व्यक्त करण्यात येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रीमती स्वराज यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक झंझावाती आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व हरपले आहेअशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
श्रीमती स्वराज भारतीय राजकारणातील एक खंबीर नेतृत्व होते. गेल्या पन्नास वर्षांच्या राजकीय वाटचालीत त्यांनी संसदीय राजकारणात स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध विभागांचा कार्यभार त्यांनी जबाबदारीने सांभाळला होता. विशेषत: एका महत्त्वाच्या कालखंडात त्यांनी पाच वर्षे परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळली होती. याबाबत मंत्रिमंडळ सदस्यांकडून भावपूर्ण स्मरण करण्यात आले.
-----०-----

No comments:

Post a Comment