·
स्वातंत्र्य
दिनाचा शानदार सोहळा संपन्न
·
नागपूरसह
विदर्भाच्या विकासाला प्राधान्य
·
औद्योगिक
विकासासोबत कौशल्य विकासावर भर
·
सामाजिक,सांस्कृतिक
व पर्यटनाला निधी
·
प्रत्येक
गावाला पिण्याचे शुध्द पाणी
·
लोकसहभागामुळेच
वृक्ष लागवड मोहिम यशस्वी
·
लवकरच
कोराडी येथे शिल्पग्रामची उभारणी
·
विदर्भ
व मराठवाडयातील उद्योजकांना वीज सवलत
नागपूर
दि. 15 : शासन, प्रशासन व
लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साध्य करण्यासाठी
माहिती व तंत्रज्ञानाबरोबरच कौशल्य विकासाची जोड देवून विकासाचा पल्ला गाठावयाचा
आहे. विकास प्रक्रियेत सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री
तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
विभागीय आयुक्त
कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाचा 69 वा वर्धापनदिनाचा मुख्य शासकीय
सोहळयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभेहस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या
शुभेच्छा देतांना ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा
सावरकर, विभागीय आयुक्त अनूप कुमार, पोलीस आयुक्त एस.पी.यादव, जिल्हाधिकारी सचिन
कुर्वे, आमदार जोगेंद्र कवाडे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती दिपक म्हैसेकर,
मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी भगत,
स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वातंत्र दिनाच्या 69 व्या वर्धापनाच्या उपस्थित जनतेला शुभेच्छा देतांना सांगितले की, देशाला
स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या शूर स्वातंत्र्य संग्राम सैनिकानी बलिदान दिले, आपल्या सर्वस्वाचा त्याग केला
त्या सर्वाना मी विनम्र अभिवादन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी व
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षात
शासनाने अनेक प्रगतीशिल निर्णय घेऊन ग्रामीण व शहरी विकासाच्या योजना अंमलात
आणल्या. विशेषत: उद्योगाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी मेक इन महाराष्ट्र ही संकल्पना प्रभावीपणे
राबविली असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री पुढे म्हणाले
की, नागपूर शहरातील 2001 नंतरचे भूखंड नियमित होणार असून एक हजार चौरस फूट पर्यत
क्षेत्राचे व 2001 पूर्वी खरेदी झालेले प्लॉटचे गुंठेवारी कायद्यातंर्गत
नासुप्रद्वारे नियमितीकरण करण्यात येणार आहे. नागपूर शहाराच्या हद्दीबाहेर 25 किलो
मीटरच्या परिसरात नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या नवीन नागपूरच्या प्रस्तावित
आराखडयास शासनाने मंजूरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 10 किलो मीटरपर्यतचा विकास
करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जलशिवार योजनेतंर्गत जिल्हयात 313 गावांची निवड
करण्यात आली. या गावामध्ये मार्च 2016 पर्यत 3806.66 लाख रुपये खर्च करण्यात आले
यातून 2634 कामे पूर्ण झाली आहेत. सन 2016-17 मध्ये नव्याने 185 गावांची निवड
करण्यात आली आहे. यासाठी 13578.60 लाखाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
स्मार्ट शहराच्या धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी स्मार्ट विलेजची संकल्पनेतील मौदा तालुक्यातील खंडाळा, कामठीतील खसाळा
आणि तिरोडी हिंगणातील दाभा आणि नागपूर ग्रामीण मधील विहीरगाव या गावातील
ग्रामपंचायतीचे सर्व सेवा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. जिल्हयातील 500 ग्रामपंचायती
डिजीटल ग्राम झाले आहेत. नागपूर जिल्ह्याला देशातील पहिला डिजीटल जिल्हा होण्याचा
मान मिळणार आहे.
मेट्रो रेल्वे प्रकल्प मार्च 2018 पर्यंत
कार्यान्वित होणार आहे. मेट्रोच्या उत्तर-दक्षिण मार्गावरील खापरी ते सिताबर्डी या
टप्प्याचे काम वर्धा मार्गावर गतीने सुरु आहे. नागपूर शहाराच्या सौंदर्यात भर पडावी
म्हणून दक्षिण सांस्कृतिक केंद्राच्यावतीने कोराडी येथे 50 एकर जागेत शिल्पग्राम
उभारले जाणार आहे. या शिल्पग्राम अभियानात राज्याची संस्कृती, लोककला, लहान
मुलांसाठी कार्यशाळा व इतर सुविधा असतील असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नागपूर
जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत व खाजगी बँकानी
जिल्ह्यातील खरीप पिक कर्ज वाटपाचे 769.94 कोटी रुपये कर्जाचे उद्दिष्ट
शंभर टक्के पूर्ण केले. जिल्हयातील 82551 खातेदारांना कर्जाचे वाटप करण्यात आले.
जिल्हा बॅकेतर्फे कर्ज घेतलेल्या 36 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जावरील 50
टक्के व्याज माफ करुन त्यांना पुन्हा कर्जास पात्र करण्याचा निर्णय घेऊन
जिल्हाधिकाऱ्यांनी कर्ज वाटपाचे आपले लक्ष पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी सचिन
कुर्वे यांचे पालकमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले.
जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये डासांवर
नियंत्रणासाठी फाँगिंग मशिन देण्यात येणार आहे. चांगल्या फॉगिंग मशीन प्रत्येक
गावात घेण्यासाठी डीपीसीतून पाच कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही
त्यांनी यावेळी सांगितले.
विदर्भ व
मरठवाडयातील उद्योगांना वीज सवलत
विदर्भ व मराठवाडा भागातील वीज ग्राहकांना
वीज दरात सवलत देण्याची घोषणा शासनाने केली होती. मंत्रीमंडळाने त्यास मान्यता
दिली. यामुळे विदर्भ व मराठवाडा क्षेत्रातील नवीन औद्योगिक ग्राहकांना 75 ते 50
पैसे प्रती युनीट सवलत देण्यात आली. यासाठी शासनाने 1 हजार 14 कोटींची तरतूद केली.
पायाभूत विद्युत सुविधासाठी 1019 कोटी,
दुष्काळग्रस्त 21 जिल्ह्यातील वीज जोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा व विद्युत
प्रणालीचे सक्षमीकरण व बळकटीकरण 2016-17 व 2017-18 महावितरणला 1019 कोटी निधी
अनुदान स्वरुपात दिला आहे. मागील दुष्काळाची तीव्रता असलेल्या मराठवाडयाला 552
कोटींचा निधी देण्यात आला, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (सन 2014-15) शिष्यवृत्तीधारक अखिलेश विनय गणेशकर,
कु. साक्षी अनिल पिंपळे, सिद्धार्थ शरद चांडक, कु.मैत्रेयी मिलींद यावलकर, श्रृतेश
तापेश पाटील, समीर विवेक पांडे, अभिषेक संदिप तानपूरे, क्षितु बिपीन देवगडे,
कु.निकीता नविन चांडक, हर्षीत संजय कोठारी यांना प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात
आला.
पोलीस अधिक्षक कार्यालय सिव्हील लाईन व पोलीस
मुख्यालय कामठी रोड या दोन्ही जमिनीबाबत उपस्थित झालेला प्रश्न निकाली लावून
विभागास सहकार्य केल्याबद्दल महेशकुमार एच. गोयल, सल्लागार यांना प्रशस्तीपत्र
देण्यात आले. तसेच माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत नोंदनी केलेल्या
लाभार्थ्यांना संजय सिताराम सहारे - लिंगा, कळमेश्वर, संदीप शामराव किंदर्ले -
पाचगांव, उमरेड, रविंद्र रंगराव नेवारे – खापरी, उमरेड, सतिश मारोतराव टेकाडे –
गुमथडा, कामठी, मंगेश घनश्याम डाखरे – वडोदा, कामठी यांना प्रमाणपत्र देवून गौरव
करण्यात आले.
*****
No comments:
Post a Comment