Tuesday 11 October 2016

आसूरी शक्तिवर सज्जन शक्तिने विजय मिळवू या - मुख्यमंत्री



जयताळा येथे रावण दहन कार्यक्रम

नागपूर, दि.11 :  आजचा दिवस हा आसूरी शक्तिचा दहन करण्याचा आहे. प्रभू रामचंद्र यांनी आसूरी शक्तिवर सज्जन शक्तिने विजय मिळविला होता, आपणही आज चांगल्या कर्माने वाईट कर्मावर विजय मिळविण्याचा निर्धार करु या, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते झुंजार नागरिक मंच, जयताळा नागपूर यांच्या वतीने आयोजित भव्य रावण दहन कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले व झुंजार नागरिक मंच, जयताळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सामान्य माणूस आसूरी शक्तिवर विजय मिळवू शकतो हे प्रभु रामचंद्र यांनी दाखवून दिले आहे. आपणही चांगले कर्म करून आसूरी शक्तिला पराभूत करण्याचा संकल्प करु या ऐसे मुख्यमंत्री म्हणाले. आजचा दसरा अतिशय ख़ास असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, आपल्या सैनिकांनी अभिनंदनीय कामगिरी केली. त्यांचा देशाला सार्थ अभिमान आहे. सत्याचा नेहमी जय होईल असा निर्धार आपण करु या. सत्याच्या मार्गाने मार्गक्रमण करु तरच आपल्याला आदर्श जीवन प्राप्त होईल असे ते म्हणाले.
झुंजार नागरिक मंच, जयताळाचे पदाधिकारी दत्तू वानखेड़े व नानाजी सातपुते यांनी जलयुक्त शिवार अभियानासाठी प्रत्येकी 21 हजाराचा धनादेश मुख्यमंत्री यांना सुपुर्द केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय राऊत यांनी केले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत रावण दहन करण्यात आले.
00000000

No comments:

Post a Comment