मुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘जालना जिल्ह्याचा सर्वांगीण विकास’ या विषयावर पाणीपुरवठा
व स्वच्छता तथा जालना जिल्हा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची विशेष मुलाखत
आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित
होणार आहे. ही मुलाखत दि. २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित
होणार आहे.
शासनाने जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी अनेक निर्णय घेतले. जालना
जिल्ह्यात 176 गावांना वॉटरग्रीडव्दारे पाणीपुरवठा, लातूर जिल्ह्यात
रेल्वेने पाणी पुरवठा, तसेच राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, पाण्याची बचत व्हावी
यासाठी मीटरव्दारे पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे धोरण, सांडपाण्याचा
पुनर्वापर करण्यासाठी परसबाग आदी योजना व उपक्रमांविषयी श्री. लोणीकर यांनी दिलखुलास
कार्यक्रमातून माहिती दिली आहे. ही मुलाखत रुपलक्ष्मी चौगुले-शिंदे यांनी घेतली आहे.
००००
No comments:
Post a Comment