नागपूर, दि. 17 : राज्य
शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत
उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी, वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, सोशल
मीडिया पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी या स्पर्धेसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2020 अशी
राहील. उत्कृष्ट पत्रकारिता
पुरस्कार-2019 साठी माहिती पत्रक/अर्जाचे
नमुने www.dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या
पुरस्कारासाठी पत्रकारांनी जास्तीत जास्त
सहभाग घ्यावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात आले आहे.
****
www.dgipr.maharashtra.gov.in link error
ReplyDelete