Thursday, 16 April 2020

मनरेगाने दिला ग्रामीण जनतेला रोजगाराचा दिलासा



राज्यात 35 हजार  कामांना मिळाली मंजुरी
जलसंधारण व सिंचनाच्या कामांना प्राधान्य
नागपूर, दि.16 : कोरोना प्रतिबंधासाठी सध्या संपुर्ण राज्यात लॉकडाऊन्‍ची उपाययोजना  लागु करण्यात आली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून  त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न बिकट होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणा-या या  घटकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगारा हमी योजनेच्या माध्यमातुन मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यात या योजनेतुन  वैय‍िक्तक तसेच सामुहिक स्वरूपाच्या   एकूण 35 हजार कामांना प्रशासकीय व तांत्रिक  मान्यता देण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे   ग्रामीण भागातील जनतेसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे . विशेषत लॉकडाऊनमुळे विविध औदयोगिक तसेच वाणिज्यिक  आस्थापना  बंद असल्याने त्याचा मोठा फटका कामगार आणि हातमजुरी करणा-यांना बसला आहे.लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्याने 3 मे पर्यत या मजुरांच्या अडचणीत मोठी भीती व्यक्त करण्यात आली होती या पार्श्वभुमीवर  केंद्र शासनाने सोशल डिन्स्टींग विषयक निर्देशांचे पालन करत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांना मान्यता दिली आहे.त्या मुळे जलसंधारण ,सिंचन विहीरी ,पशुंसाठी गोठयांचे बांधकाम, व्हर्मी कंपोस्ट,फलोत्पादन,मजगी आदी वैयक्तीक स्वरूपाच्या कामांसोबतच  शेतीला जोडणारे रस्ते जलसंधारण ,नाला सरळीकरण,सामुहिक विहीरी ,वृक्षारोपणाची पुर्वतयारी तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे घेणे सुलभ झाले असल्याची माहिती मनरेगा आयुक्त ए.एस.आर नायक यांनी दिली.
ग्रामीण भागातील  शेतमजुंरासमोर निर्माण झालेल्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातुन वैयक्तीक कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.राज्यात लॉकडाऊनची परिस्थीती असल्यामुळे  26 हजार 886 ग्रामपंचायती मध्ये  एकही काम सुरू नसल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे खरीप हंगामाच्या दृष्ट्रीने शेतीसाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या कामाचा जलसंधारणाची तसेच सिंचन ‍विहीरींची कामे  प्राधान्याने सुरू करावी यासाठी जिल्हास्तरावर रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यपालन अधिकारी यांनी गावनिहाय मंजुर झालेल्या कामांची नियोजन करून त्यानुसार तालुका व ग्रामीण स्तरावर प्रत्यक्ष काम सुरू होतील या दृष्ट्रीने नियोजन करावे यासाठी लाभार्थ्याची व्यक्तीश संपर्क साधावा अशा सूचना मनरेगा आयुक्त  श्री.नायक यांनी दिल्या आहेत.
कृषीसंलग्न वैयक्तिक कामांना प्राधान्य ग्रामीण भागात मनेरेगा अंतर्गत कामे सुरू करतांना कृषीसंलग्न अशा वैयक्तिक कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.यामध्ये 4 हजार 208 सिंचन विहीरी,5 हजार 304  पशुगोठे 8 हजार 366 शोकपीट  त्यासोबतच शेततळी ,मजगी विहीर पुर्नभरण आदी कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
नागपूर विभागात एकूण 5 हजार 258 कामांना तात्रिंक व प्रशासकीय कामांना मंजूरी देण्यात आल्या मुळे ही कामे तात्काळ सुरू करणे शक्य झाले आहे.विभागात मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये चंद्रपुर  जिल्हयात 636  कामे,गडचिरोली 1 हजार 638 कामे, गोदींया 1हजार 658 कामे  नागपूर 605 वर्धा 665 भंडारा 2 हजार 56 अशा एकुण 5 हजार 258  कामांचा समावेश आहे.
*****

No comments:

Post a Comment